गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा   

ग्रामस्थांची मागणी

वाल्हे, (वार्ताहर) :  वाल्हे येथे चालू असलेल्या गुंजवणी प्रकल्पाच्या पाईपलाइनचे काम दोन दिवसांपुर्वी बंद करण्यात आले होते. गुरूवारी वाल्हे व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी हे काम पुन्हा चालू केले आहे. हा प्रकल्प वाल्हे व परिसराला नवसंजीवनी देणारा प्रकल्प आहे. हा प्रकल्प झाल्याने सर्व वाड्या-वस्त्या सुजलाम सुफलाम होणार आहेत, त्यामुळे हे काम असेच जोमाने चालू ठेवण्याची मागणी वाल्हे, सुकलवाडी, आडाचीवाडी, वागदरवाडी ग्रामपंचायतींच्या वतीने सरपंचांनी सर्व शेतकरी वर्गाने केली.
 
काही शेतकर्‍यांच्या प्रकल्पाबद्दल काही गैरसमज झाले असतील तर सर्व अधिकार्‍यांनी त्यांच्यासोबत संवाद साधत गैरसमज दूर करावेत, अशीही मागणी सर्व सरपंचांनी केली. वाल्हे व परिसरातील सर्व क्षेत्र हे वलीताखाली येत असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी या प्रकल्पाचे स्वागत करत हे काम चालू ठेवण्याची मागणी सरपंचांनी केली. 
 
यावेळी वाल्हे गावचे माजी सरपंच दत्तात्रय पवार, माजी सरपंच महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, आडाचिवाडी सरपंच सुवर्णा पवार, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, वाल्हे ग्रा.पं.सदस्य सागर भुजबळ, संभाजी पवार, राहुल यादव, धनंजय पवार, संतोष पवार, नितीन गावडे, हनुमंत पवार, अंकुश चव्हाण, विकास पवार, स्वप्नील भुजबळ, मनोज घाटे, अजय कुदळे, गणेश पवार व शेतकरी उपस्थित होते.,
 

Related Articles